Shetkaryana Navin Vihir Yojana 2024
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 | शेतकऱ्यांना नवीन विहीर योजना २०२४ :- राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीमधून राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरीचा लाभ देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सन २०१९-२०२० मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रुपये २२. ५० कोटी व तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रुपये २२. ५० कोटी निधीच्या कार्यक्रमास दि. १३. ०९.२०१९ चे शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरीचा लाभ देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यासाठी रुपये ५८. ७७ कोटी निधीच्या खर्चास उपरोक्त शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरही (www.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आलेला असून त्याचा सांकेतांक २०२००९२२१५०११५२४०१ आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन विहिरीचा लाभ ही योजना सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षात राबविण्यासाठी जिल्हानिहाय देण्यात येत असलेल्या भौतिक व आर्थिक लक्षांकाच्या तपशीलानुसार योजना राबविण्यासाठी सदर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. मार्गदर्शक सुचने नुसार योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरु करावी. चालू वर्षासाठी सदर निधीच्या मर्यादेत लाभार्थ्याची निवड करून मार्गदर्शक सूचनेनुसार या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरु करण्यात आली आहे.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी नवीन विहिरीचा लाभ
या योजनेमध्ये सन २०२३ -२०२४ या वर्षात रुपये १.५० लाख मर्यादे पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेकरिता ऑनलाइन पद्ध्तीने मागवण्यात आलेल्या शेतकरी शेतकऱ्यांच्या अर्जामधूनच पात्र लाभार्थ्याची निवड लॉटरी पद्ध्तीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा स्तरीय समिती मार्फत करण्यात येते. व त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याच्या क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात येते.
विहीर खोदण्याचे ठिकाण तांत्रिक द्रुष्ट्या योग्य असल्यास अंदाजपत्रक करून कृषी विकास अधिकारी यांची तांत्रिक मान्यता मिळते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे प्रशासकीय मान्यता देतात. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्याला पूर्व समत्ती/ कृषी अधिकारी हे कार्यारंभ आदेश देतात.
कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ३० दिवसाच्या आत लाभार्थी शेतकऱ्याने विहिरीचे काम सुरु न केल्यास त्या शेतकऱ्याची निवड रद्द करण्यात येते. कृषी अधिकारी हे विहिरीच्या कामाची मापन पुस्तिका नोंदवतात. काम पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला जिल्हा कृषी अधिकारी व घट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्या अहवालानुसार, कृषी विकास अधिकारी यांच्या शिफारशी नुसार पी एफ एम एस प्रणाली द्वारे लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खात्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे थेट लाभ हस्तांतरणा द्वारे DBT जमा करण्यात येते .
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : निकष
- लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक राहील.
- नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे त्याच्या स्वताच्या नावावर किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर, क्षेत्र आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.( नगर पंचायत,नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्राबाहेरील )
- लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वताचे आधाकार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी शेतकऱ्याचे स्वताचे बँक खाते असले पाहिजे व सदर बँक खाते आधारकार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०,००० /- पेक्षा जास्त नसावे.
- ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १, ५०,००० /-च्या मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबधित तहसीलदार यांच्या कडून सन २०२३ -२०२४ चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेऊन अर्जा सोबत सादर करणे बंधन कारक राहील.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : लाभार्थी निवड करताना समितीने घ्यावयाची दक्षता
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी कृषी गणने नुसार जिल्ह्यातील एकूण अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांपैकी योजनेच्या निकषात पात्र असणाऱ्या ( ०.४० हेक्टर ते ६. ०० हेक्टर धारण करणाऱ्या )संबधित तालुक्यातील सदर प्रवर्गाच्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांचा आर्थिक लक्षांक निश्चित करावा व सदर लक्षांकाच्या मर्यादेत संबधित तालुक्यातील इच्छुक शेतकर्यांमधून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. कृषी गणना अहवाल कृषी विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
संबधित तालुक्याच्या आर्थिक लक्षांका पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा निवड समितीने लाभार्थ्यांच्यी सोडत पद्ध्तीने निवड करण्यात येईल. ही सोडत प्रक्रिया अर्जदारांच्या व लोक प्रतिनिधीच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर तालुकानिहाय राबवण्यात येणार. तसेच सोडती द्वारे प्रत्येक तालूक्यातील लाभार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी क्रमवारी नुसार प्रसिद्ध करण्यात येईल.
तालुकानिहाय याद्यांच्या प्रति पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येतील, तसेच जिल्हा परिषदेच्या/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर पण प्रसिद्ध करण्यात येणार. लाभार्थी निवड लॉटरी पद्ध्तीने करताना “इन कॅमेरा ” केली जाईल.
या योजने अंतर्गत बाबींची विहित कालावधीत अंमलबजावणी न करणाऱ्या लाभार्थ्याची पूर्व संमती रद्द करण्यात येईल. व तसे त्यांना लेखी स्वरूपाने कळवण्यात येईल. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील क्रमवारी नुसार पात्र असणाऱ्या पुढील लाभार्थ्याची निवड केली जाईल. तालुकानिहाय आर्थिक लक्षांकाच्या मर्यादेत पात्र लाभार्थी न मिळाल्यास ज्या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांमधून समन्यायी पद्ध्तीने लाभार्थ्यांची निवड करणे बाबतची कार्यवाही जिल्हा निवड समिती करणार.
पात्र लाभार्थ्यांची यादी कृषी विकास अधिकारी यांनी संबधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवण्यात येईल. सदर कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या तरतुदीच्या मर्यादेत जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विकास अधिकारी यांच्या समन्वयाने अंमलबजावणी करण्यात येईल.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : लाभधारकाची पात्रता
१. लाभार्थी कडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
२ . नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.
३. दोन सिंचन विहिरी मध्ये किमान १५० मिटर अंतराची अट आहे. मात्र हि अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
१. १५० मीटर अंतराची अट Run-Off zone तसेच अजा अज व दारिद्रय रेषेखालील कुटुंबा करिता लागू नाही.
२. मग्रारोहयो या योजने अंतर्गत विहीर मंजूर करताना खाजगी विहिरी पासून १५० मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
४. लाभ धारकाच्या ७/१२ वर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
५. एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त नसावे.
६. ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे.
७. लाभार्थ्यांच्या ७ / १२ वर तसेच प्रत्यक्ष विहीर असल्यास लाभ मिळणार नाही.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : कागदपत्रे
१. विहित नमुन्यातील अर्ज ( प्रपत्र-अ )
२. संमती पत्र ( प्रपत्र-ब )
३. ७/१२ उतारा
४. ८ अ
५. जॉब कार्ड
६. जात प्रमाणपत्र
७. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक जमीन असल्याचा पंचनामा
८. सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्या मध्ये करारपत्र
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : लाभार्थी निवड कार्यवाही
लाभार्थी निवड ग्राम सभेच्या मान्यतेने होते. त्यानंतर तांत्रिक मान्यता हे तांत्रिक सहाय्यक देतात तर प्रशासकीय मान्यता हे घट विकास अधिकारी देतात. प्रशासकीय मान्यता मिळाल्या नंतर शक्य तेवढ्या लवकर काम पूर्ण करावे. सलग दोन वर्षात काम पूर्ण झालेच पाहिजे. तथापि काही अपवादात्मक परिस्थिती जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने सदर कालावधी ३ वर्षे करता येतो.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या व्याख्येप्रमाणे सेमीक्रिटीकल, क्रिटीकल, ओव्हरएक्सप्लोयटेड क्षेत्रामध्ये फक्त समूह विहिरी घेता येतात. सुरक्षित क्षेत्रामध्ये ( safe zone ) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरीची कामे घेता येतात.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : अर्ज व कार्यपद्धती
-
- कृषी गणने नुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करावा.
-
- अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वसांक्षाकीत छायांकित प्रतीसह कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे स्वहस्ते सादर करावा व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्या कडून अर्जाची लेखी पोहच देण्यात येईल. जर अर्ज अपूर्ण असल्यास अर्जदारास उणिवांच्या पुर्तेतेस विहित मर्यादा/ कालावधी देवून परिपूर्ण अर्ज/ प्रस्ताव सादर करणे साठी लेखी स्वरुपात कळविण्यात येईल.
-
- पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेले अर्ज कृषी अधिकारी हे क्षेत्रीय पाहणी करून गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय निवड समितीकडे अंतिम निवडीसाठी सादर केले जातील.
-
- तालुका स्तरावर पात्र अर्जदार/ लाभधारक यांच्या बाबत भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्यास कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी हे जबाबदार राहतील.
-
- जिल्हा स्तरावर प्राप्त अर्जांची/ प्रस्तावांची योजनेच्या निकषा आधारे जिल्हा कृषी अधिकारी हे नियमित तपासणी करतील. तपासणीत त्रुटी आढळलेल्या अर्जा बाबत संबधित कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत १० दिवसाच्या आत पूर्तता करून घ्यावी. १० दिवसात पूर्तता झाली नाही तर संबधित लाभार्थ्यास अर्ज बाद झाल्याचे लेखी कळविण्यात येईल.
-
- तालुक्याच्या लक्षांका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त लाभार्थी निवडीचे निकषानुसार परिपूर्ण अर्जातून लॉटरी पद्ध्तीने पुढील ५ दिवसात लाभार्थी निवड करण्यात येईल.
-
- अंतिम निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्याला कृषी अधिकारी व पंचायत समिती मार्फत निवड झाल्याचे लेखी स्वरुपात कळविण्यात येईल.
-
- वैयक्तिक लाभार्थी निवड करताना महिला व अपंग या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. एकूण मंजूर निधीपैकी ३ टक्के निधी अपंग लाभार्थ्यांकरिता राखून ठेवली जाणार. परंतु करूनही असे लाभार्थी उपलब्ध झाले नाही तर आवश्यक अभिलेख संग्रही ठेवून इतर शेतकऱ्याना लाभ देण्यात येईल.
Shetkaryana Navin Vihir Yojana 2024 : विचारले जाणारे प्रश्न
१ ) शेतकऱ्यांना नवीन विहीर योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
-या योजनेसाठी तुम्हाला अर्ज ग्रामपंचायत मध्ये करावा लागेल.
२ ) या योजनेसाठी अनुदान किती आहे ?
-जास्तीत जास्त ४ लाख इतके अनुदान असेल.
३ ) नवीन विहीर योजना काय आहे ?
-ही योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली एक महत्वाची योजना आहे.
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page